पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018
” पूर्वी जंगलात राहाणारा बिबट्या आता उसाच्या फडात राहू लागला आहे. जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय, अशीच स्थिती झाली आहे. ऊस तोडला की हेच बिबटे गावात येऊन धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे केवळ जंगली आणि डोंगरी भागांत असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहे. त्यांच्यापासून सुरक्षेसाठी आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. झपाट्याने कमी होत जाणार्या जंगलांमुळे मार्जार कुळातील वाघ, सिंह, चित्ता या प्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले असले तरी अतिशय चाणाक्ष समजल्या जाणार्या बिबट्याने मात्र याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मानवी आक्रमणामुळे वन्यप्राण्यांचा हक्काचा अधिवास नष्ट होत चालल्याने त्यांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवला आहे. सध्या पंढरपूर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असून अद्यापही हा बिबट्या जेरबंद न झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम आहे. ”
हा सविस्तर वृत्तांत. पंढरपूर तालुक्यात बिबट्याने दोन शेळ्या व एका गायीची शिकार केल्यामुळे पशुपालकांचे नुकसान झाले आहे. सदर पशुपालकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासननिर्णय 11 जुलै 2018 नुसार नुकसान भरपाई व अर्थसहाय्य मिळण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. सर्वात आधी वाखरी येथील विकास गायकवाड यांच्या गायीची शिकार बिबट्याने केली होती. त्यांना 23 हजार 395 रु. एवढी आर्थिक नुकसान भरपाई मंजुर झाली असून लवकरच ही रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच इतर पशुपालकांनाही नुकसान भरपाई मिळावी यासाठीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना पंढरपूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एन. पवळे यांनी दिली आहे.
अतिशय चाणाक्ष व लपूनछपून हल्ला करण्यात तरबेज असणारा बिबट्या पिंजर्यात अथवा सापळ्यात अडकण्याची चिन्हे कमीच आहेत. बिबट्यास पकडल्यानंतर पुन्हा निसर्गातच मुक्त करावे लागत असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांचाच पुढाकार आवश्यक आहे. त्यांचे नैसर्गिक घर त्यांना परत देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. वनविभागाकडून वनक्षेत्रात रोपांची लागवड केली जात आहे. वनाच्छादित क्षेत्राची टक्केवारी वाढल्यास या समस्येची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच सर्व गोष्टी मिळत असल्याने त्यांना त्यांचा निवारा पुन्हा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आपलीच आहे. अभयारण्य तयार करुन देण्याने तात्पुरता प्रश्न मार्गी लागू शकेल. परंतु, यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी वनाच्छादित क्षेत्र वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







