👁 12 Views

रात्रशाळा जीआरवरून शिक्षकांत दोन तट



मुंबई
राज्य सरकारने ल रात्र शाळांसाठी नियमावली आणि इतर माहिती जाहीर करताना नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. या जीआरवरून राज्यातील रात्रशाळा शिक्षकांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा जीआर जाहीर केल्यासंदर्भात शुक्रवारी रात्र शाळांतील शिक्षकांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. तर दुसरीकडे या जीआरविरोधात आंदोलनाची हाक देत उपोषणाला बसण्याचा इशारा शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रात्र शाळांतील अर्धवेळ शिक्षकांना दिलासा देत पूर्णवेळ वेतन देण्यासंदर्भातील निर्णय शालेय विभागाने या जीआरच्या माध्यमातून जाहीर केला. यापुढे रात्रशाळा अर्धवेळ शाळा म्हणून गणल्या जाणार असणार असून, दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार आहे. प्रत्येक शाळेत बायोमेट्रीक हजेरी, ११ वर्षांपासून रात्रशाळेत प्रवेश, शिक्षकांना वैद्यकीय खर्चांची प्रतिपूर्ती, शिक्षकांना शालेय वेतन प्रणाली आणि अनुकंपा धोरण लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय रात्रशाळांसाठी उत्तम असल्याचे रात्रशाळांतील शिक्षक निरंजन गिरी यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी रात्रशाळा शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने रात्रशाळेतील शिक्षक उपस्थित होते.

दुसरीकडे रात्रशाळांसंदर्भातील जीआर रात्रशाळा उद्ध्वस्त करणारा ठरणार असल्याचा दावा ‘शिक्षक भारती’ने केला आहे. रात्रशाळांबाबत १५ जून २०१७ पर्यंत निर्णय न घेतल्यास शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. रात्रशाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक – शिक्षकेतरांवर अन्याय करणारा शासन निर्णय १७ मे २०१७ रोजी काढला आहे. या निर्णयानुसार रात्रशाळांमध्ये अध्यापन करणारे १०१० अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक आणि ३४८ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.














सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *