Pandharpur LIVE 25 February 2019
मुंबई:
नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या बदलीमुळं रिक्त झालेल्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. सिंघल यांना औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नांगरे-पाटलांसह अन्य अनेक अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. विश्वास नांगरे-पाटील हे एक बेधडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. खडतर परिस्थितीतून आयपीएस झालेले नांगरे-पाटील हे त्यांच्या कामामुळं महाराष्ट्रातील तरुणांचे आयकॉन ठरले आहेत. त्यांनी आतापर्यंत मुंबई, ठाणे ग्रामीण, लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण व कोल्हापूर अशा विविध विभागांत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
https://play.google.com/store/apps/details…
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
या बातम्यांबद्दल अधिक वाचा:
महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.
- Marathi News
- mumbai news
- vishwas nangare-patil will be new police commissioner of nashik
वर्दीतील ‘दर्दीं’चे कलागुण बहरणार
पोलिस म्हटले की खाकी वर्दीतील तापट स्वभावाची, असंवेदनशील व्यक्ती अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसांत असते; परंतु या वर्दीतही मनुष्य असतो, त्याला संवेदनशील मन असते व प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो.
पोलिस म्हटले की खाकी वर्दीतील तापट स्वभावाची, असंवेदनशील व्यक्ती अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसांत असते; परंतु या वर्दीतही मनुष्य असतो, त्याला संवेदनशील मन असते व प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. पोलिसांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबई, महाराष्ट्र नव्हे तर देशात पहिल्यांदाच मुंबईत पोलिसांचे साहित्य संमेलन आज, सोमवारी होत आहे. यात राज्यभरातील शेकडो पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र पोलिसांत अनेक कवी, लेखक, विविध विषयांत पारंगत असलेल्यांचा समावेश आहे. कामाचे स्वरूप, कठोर शिस्त यांमुळे त्यांच्यातील या कलागुणांना वाव मिळत नाही. त्यामुळे नाट्य संमेलन, साहित्य संमेलन या धर्तीवर पोलिसांसाठी एक साहित्य संमेलन आयोजित करावे अशी कल्पना राज्य राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांना सुचली. त्यांनी ती पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासमोर मांडली. पडसलगीकर यांनादेखील ही कल्पना आवडली आणि राज्यातील अशा हौशी पोलिसांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार सोमवारी यशवंतराव प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात खाकी वर्दीतील दर्दींची साहित्य मैफल रंगणार आहे. सुमारे १२५ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी आपली कला सादर करतील. यामध्ये मुंबईतील ३५ पोलिसांचा समावेश
असे असेल नियोजन
कुलाबा येथील राज्य पोलिस मुख्यालयातून सकाळी नऊच्या सुमारास ग्रंथ दिंडी निघेल. यशवंतराव प्रतिष्ठान येथे दिंडी पोहोचल्यानंतर कवी संमेलन, पोवाडे, गझल, कव्वाली, परिसंवाद, प्रगट मुलाखती, साहित्य प्रकाशन, साहित्य प्रदर्शन या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अशोक नायगावकार, अशोक बागवे हे उपस्थित राहणार आहेत.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा:
महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.
- Marathi News
- mumbai news
- 1st police literature conference in mumbai
EXPLORE MAHARASHTRA TIMES
QUICK LINKS :
मुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला‘मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील’


