Pandharpur LIVE 24 March 2019
कोल्हापूर : देश चालवण्यासाठी ५६ पक्षांची नाही तर ५६ इंचाच्या छातीची गरज असते अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरात प्रचारशुभारंभ सभेत महाआघाडीवर केली. मुख्यमंत्री म्हणाले, हिंदुत्ववादी पक्षांची युती असल्याचा अभिमान आहे. आघाडीत ५६ पक्ष असल्याचे आठवले यांनी सांगितले. पण हे पक्ष रजिस्टर तरी आहेत का, कोणत्याही रस्त्यावरील संघटनेला उचलले आणि व्यासपीठावर बसविल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवारांनी कॅप्टनशीप मागे घेतली. नावात राष्ट्रवादी असून कामाचे नाही, मनात राष्ट्रवाद असावा लागतो. त्यांना उमेदवार सापडत नाहीय. या निवडणुकीतही एनडीएची सत्ता येणार. गरिबाची गरीबी कधी हटली नाही, काँग्रेसच्या सग्यासोय-यांची गरीबी हटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जनधन खाती, शौचालये उभारली. महिलांना विचारा त्यांना किती वाईट वाटत होते, जेव्हा त्यांना बाहेर जावे लागत होते. शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे गेले. आम्हाला साखर सम्राटांचे भले करायेचे नव्हते. चार वर्षाच्या काळात कोणालाही एफआरपीसाठी आंदोलन करावे लागले नाही. मोदींनी पॅकेज दिले. ३१ रुपयांचा कमीतकमी दर दिला.
यावेळी राज ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सुर्यासारखे आहेत. सुर्याकडे पाहून थुंकल्यास आपल्याच चेह-यावर पडते. यामुळे सावध असा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहोत तर तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे. काही लोक राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूत सामिल झाले आहेत, असे राजू शेट्टी यांचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, विनायक मेटे यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित होते. यावेळी सातारा मतदारसंघासाठी भाजपने नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत पाठवले आणि उमेदवारी मिळवली.
कोल्हापूर : देश चालवण्यासाठी ५६ पक्षांची नाही तर ५६ इंचाच्या छातीची गरज असते अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरात प्रचारशुभारंभ सभेत महाआघाडीवर केली. मुख्यमंत्री म्हणाले, हिंदुत्ववादी पक्षांची युती असल्याचा अभिमान आहे. आघाडीत ५६ पक्ष असल्याचे आठवले यांनी सांगितले. पण हे पक्ष रजिस्टर तरी आहेत का, कोणत्याही रस्त्यावरील संघटनेला उचलले आणि व्यासपीठावर बसविल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवारांनी कॅप्टनशीप मागे घेतली. नावात राष्ट्रवादी असून कामाचे नाही, मनात राष्ट्रवाद असावा लागतो. त्यांना उमेदवार सापडत नाहीय. या निवडणुकीतही एनडीएची सत्ता येणार. गरिबाची गरीबी कधी हटली नाही, काँग्रेसच्या सग्यासोय-यांची गरीबी हटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जनधन खाती, शौचालये उभारली. महिलांना विचारा त्यांना किती वाईट वाटत होते, जेव्हा त्यांना बाहेर जावे लागत होते. शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे गेले. आम्हाला साखर सम्राटांचे भले करायेचे नव्हते. चार वर्षाच्या काळात कोणालाही एफआरपीसाठी आंदोलन करावे लागले नाही. मोदींनी पॅकेज दिले. ३१ रुपयांचा कमीतकमी दर दिला.
यावेळी राज ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सुर्यासारखे आहेत. सुर्याकडे पाहून थुंकल्यास आपल्याच चेह-यावर पडते. यामुळे सावध असा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहोत तर तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे. काही लोक राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूत सामिल झाले आहेत, असे राजू शेट्टी यांचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, विनायक मेटे यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित होते. यावेळी सातारा मतदारसंघासाठी भाजपने नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत पाठवले आणि उमेदवारी मिळवली.



