शेटफळगढे- इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त पावसावर अवलंबून आहे. शेटफळगढे परिसरातील लाकडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, पिंपळे या गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. या गावातील शेतीला विहिरीतील पाण्याव्दारे सिंचित केले जाते. विहिरी व कूपनलिका यांची संख्या या परिसरात जास्त आहे. मात्र, सध्या परिसरातील विहिरींनी तळ गाठलेला असल्याने शेतीसाठी पाणी कमी पडत आहे. परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी मोठा पाऊस पडावा, यासाठी शेतकरी आशावादी आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




