गुवाहाटी
आता निराशेची जागा आशेने घेतली आहे. काहीतरी चांगलं घडेल, असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. नक्कीच लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होणार आहेत, अशा शब्दांत जनतेला आश्वस्त करताना २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
केंद्रातील एनडीए सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त आसामची राजधानी गुवाहाटी येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा लेखोजोखा मांडला. ‘मी छोटा माणूस आहे आणि छोट्या माणसांसाठीच मोठ-मोठी कामे करणार आहे’, असे मोदी यावेळी म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच सरकार चालवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेची साथ लाभली आहे. १०० कोटी देशवासीय प्रत्येक पावलावर सरकारसोबत आहेत. स्वच्छता अभियानाला लोकांनीच एका व्यापक आंदोलनाचं स्वरूप दिलं आहे. मीडियाचीही साथ लाभलीय. सुरुवातीला विरोधी पक्षाने टीका केली मात्र नंतर त्यांनीही माघार घेतली. जनता-जनार्दनाच्या पुढाकाराने कशाप्रकारे सरकार चालू शकतं, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
Posted inPolitics
निराशेची जागा आशेने घेतलीय: मोदी
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर
आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





