👁 10 Views

कर्जमाफी हवीच, पैसे आणायचे कुठून?

नागपूर : ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल काढलेले अपशब्द चुकीचेच आहेत. कार्यकर्त्यांनाही या शब्दाने उच्चारू नये. सत्तापक्षाने शेतकऱ्यांचा अवमान करू नये’, असा घरचा आहेर देत ‘मुख्यमंत्री मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत’, असा दावा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आाठवले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.


शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. पण, पैसे आणायचे कुठून, हे विरोधकांनीच सांगावे. शेतकरी संघटनेत अंतर्गत वाद सुरू असले तरी आमचा पक्ष ‘स्वाभिमानी’ असून, राज्य सरकारसोबत असल्याचे​ही त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकार सोडायची गरज नाही. राज्यातील सरकार भक्कम आहे. ते बाहेर पडले तरी, सरकार पडणार नाही, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, अशी आपलीही भूमिका आहे. उत्पादन वाढले की, भाव कमी होतो. त्यामुळे दर ठरविण्यासाठी तज्ज्ञ समिती असावी, अशी सूचना करीत ‘दर वाढले तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळावा’, असे आठवले यांनी सांगितले.

भाजप हा बहुजनांचा पक्ष

‘बहुजन काँग्रेसच्या बाजूने होते तेव्हा त्यांची सत्ता होती. आज हा वर्ग भाजपच्या बाजूने आहे. अनेक ठिकाणी हा पक्ष सत्तेत आहे. बौद्ध व दलित मते त्यांच्यासोबत आहेत. याचा त्यांना मोठा आधार आहे. त्यामुळेच भाजप हा बहुजनांचा पक्ष आहे’, असे प्रमाणपत्र केंद्रीय रामदास आठवले यांनी दिले.



                        सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *