ऑनलाइन वृत्त । जम्मूजम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्याच्या संबळ भागात सीआरपीएफच्या तळावर हल्ला करणाऱ्या चार आत्मघातकी दहशतवाद्यांना भारताच्या वीर जवानांनी कंठस्नान घातलं आहे. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू असून दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पहाटे ३.३०च्या सुमारास दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पमध्ये शिरून आत्मघातकी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना चोख प्रत्युतर देत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सीआरपीएफचे उपनिरीक्षक योगेश कुमार यांनी दिली. या दहशतवाद्यांकडून डझनभर हातबॉम्ब, इतर शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.
याआधी, ३ जूनला क्वाझीगुंड जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात दोन जवानांचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी सीआरपीएफला लक्ष्य करण्याचा डाव रचला होता, पण तो उधळून लावला आहे.




