👁 8 Views

‘शेतकरी संपाचे श्रेय एका संघटनेने घेऊ नये’

 मुंबई

राज्यात प्रथमच शेतकऱ्यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली हे आंदोलनाचे मोठे यश असून, सरकारतर्फे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वापर शेतातील बु‌जगावण्यासारखा केला जात आहे, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी टीका केली आहे. तसेच शेतकरी संपाचे श्रेय कुणीही एका संघटनेने अथवा व्यक्तीने घेऊ नये, असे कडू यांचे म्हणणे आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार, ही मुख्यमंत्र्यांची खेळी असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री व भाजप नेत्यांची विधाने शेतकऱ्यांना सहन होण्यासारखी नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

शेतकरी नेत्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलाने आमदार खासदार व्हायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला. पण असे लोकप्रतिनि‌धी व नेते प्रामाणिक असले पाहिजेत. या आंदोलनामागे असंतुष्ट आत्मे असल्याचा दावा सरकार करत असले तर मंत्रालयात शेतकऱ्यांना मारणारे आत्मे कोणाचे होते याचे सरकारने आत्मपरिक्षण करावे, अशी सूचन कडू यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *