👁 11 Views

‘व्हॉट्स अॅपवरचे ‘ते’ लेख नाना पाटेकरांचे नाहीत!’

 मुंबई

शेतकऱ्यांशी संबंधित एखाद्या विषयावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने एखादा लेख व्हॉट्स अॅपवर किंवा फेसबुकवर दिसला, तर अजिबात विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करा किंवा तो मेसेज डिलिट केलात तरी चालेल. कारण, नाना पाटेकर सोशल मीडियासाठी असं कुठलंही लिखाण करत नाहीत. खुद्द नानांच्या समोरच मकरंद अनासपुरे यांनी आज हा खुलासा पुन्हा केला आहे.

शेतकरी संपाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काही शेतकऱ्यांच्या बाजूने, कर्जमाफीच्या बाजूने आहेत, तर काहींचा या संपाला, त्यातील शेतमालाच्या नासाडीला आणि राजकारणाला स्पष्ट विरोध आहे. आपलंच कसं योग्य, हे पटवण्यासाठी दोन्ही गट आपल्या भूमिकेशी साधर्म्य साधणारे लेख व्हॉट्स अॅपसह सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यात नाना पाटेकर यांचा लेख ‘व्हायरल’ झालाय. ‘नव दहशतवादी’ या शीर्षकाखाली नानांचे रोखठोक विचार असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. परंतु, नानांचा या लेखाशी काहीही संबंध नाही.


सोशल मीडियावर फिरणाऱ्या या आणि अशा मेसेजबद्दल मकरंद अनासपुरे म्हणाले की, सोशल मीडियावर काय लिहायचं, पोस्ट करायचं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. परंतु, नाना पाटेकर यांच्या नावाने जे काही फिरतं, त्यात अजिबात तथ्य नाही. सोशल मीडियासाठी असं कुठलंही लिखाण नाना करत नाहीत. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नका. आमची भूमिका आम्ही जाहीरपणे मांडतो.

दरम्यान, याआधीही नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नावानं बरेच लेख, विचार सोशल मीडियावरून पसरवण्यात आले होते. तेव्हाही, या दोघांनी त्याबाबत खुलासा केला होता.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *