👁 19 Views

महात्मा गांधी खूप ‘चलाख बनिया’ होतेः शाह

रायपूर (छत्तीसगड)


छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ६५ जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी रायपूर दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. काँग्रेस पक्ष हा एका विचारधारेच्या आधारावर बनलेला पक्ष नाही. स्वातंत्र्य मिळवणे हे एक साधन होते आणि महात्मा गांधी हे एक ‘चतुर बनिया’ होते. महात्मा गांधींना माहित होते की पुढे काय होणार आहे. म्हणूनच महत्मा गांधींनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाला विसर्जित करायला हवे.

काँग्रेसला विसर्जित करा हे महात्मा गांधींनी सांगितलेले काम आता काही लोक करीत आहेत. काँग्रेसची कोणतीही विचारधारा नाही, देश चालवण्याचा, सरकार चालवण्यासाठी कोणताही सिद्धांत काँग्रेसकडे नाही, हे गांधींना माहीती होते म्हणूनच त्यांनी काँग्रेसला विसर्जित करा असे म्हटले होते, असे शहा म्हणाले. कोण काय म्हणणार या विचारात काँग्रेस नेहमी राहते. परंतु आम्ही लोकांना स्पष्टपणे सांगू शकतो की, ‘जो देशविरोधीच्या घोषणा देणार त्याला देशद्रोही म्हणणार. देशात १ हजार ६५० राजकीय पक्ष आहेत. परंतु यामध्ये भाजप आणि सीपीआय (एम) या दोन राजकीय पक्षामध्येच लोकशाही आहे. काँग्रेस पक्षात सोनिया गांधी अध्यक्षपद सोडणार असतील तर राहुल गांधींना त्यांच्याजागी बसवले जाते. परंतु भाजपचा पुढील अध्यक्ष कोण असणार हे कोणीही सांगू शकत नाही, असा दावा अमित शहा यांनी केला.

अमित शहा हे तीन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. २०१८ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ९० जागांवर लक्ष्य ठेऊन जवळपास ६५ जागा जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *