👁 7 Views

अन्नधान्याच्या किंमती घसरल्या…!

अन्नधान्याच्या किंमती घसरल्या
15 Jul. 2017

नवी दिल्ली- काल किरकोळ किमतीवर आधारीत महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. आज घाऊक किंमतीवरील महागाईही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अन्नधान्यासह भाज्याचे दर कमी झाल्यामुळे घाऊक महागाईत घट झाल्याचे सांख्यीकी विभागाने म्हटले आहे.
जून महिन्यात घाऊक किंमतीवर आधारीत महागाई केवळ 0.9 टक्‍क्‍यानी वाढली आहे. हा आठ महिन्यांचा निचांक आहे. बटाटे आणि कांद्याचे दर या काळात फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले आहे. अगोदर डाळी आणि प्रोटीनयुक्त पदार्थाचे दर वेगाने वाढत होते. आता या पदार्थाचे दर कमी वेगाने वाढत आहेत.
या आकडेवारीवर समाधान व्यक्त करून अर्थमंत्रालयाचे सल्लागार अरविंद सुब्रम्हन्यन यांनी सांगीतले की बरेच प्रयत्न केल्यामुळे आता महागाई पुर्णपणे आटोक्‍यात आली आहे.
त्यामुळे आगामी काळात एकूणच अर्थव्यवस्था वेगळ्या अवस्थेत जाणार आहे.

  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *