Video
Pandharpur Live- सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनचं चांगलं पालन केलं जातंय परंतु कांही लोकांकडून कायद्याचं उल्लंघण होतंय अशांवर कडक कारवाई केली जातीय. लॉकडाऊनचे नियम न पाळणार्या अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. चांगली बाब ही आहे की गावातील लोकांकडूनच कायद्याचं उल्लंघण झाल्याची माहिती दिली जातीय. अशा जागरुक नागरिकांचं अभिनंदन. आपल्या गावात बाहेरुन कोणी येवु नये याची काळजी घ्या. गावात बाहेरुन कोणी आले तर पोलीस कंट्रोलला माहिती द्या, आपले नांव गोपनीय ठेवले जाईल. आपल्या व आपल्या गावाच्या आरोग्यासाठी आपण काळजी घ्यावी. असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केलं आहे.

