आषाढी वारीचा धार्मिक सोहळा जाहीर.. संत तुकोबांची पालखी १६ जुनला तर संत ज्ञानदेवांची पालखी १७ जुनला करणार पंढरीकडं प्रस्थान!
25 Apr. 2017 11:29
अखंड महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत असतात, त्या आषाढी वारीचा धार्मिक सोहळा जाहीर झाला आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 16 जूनला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे १७ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
विशेतः शेतकरी वर्ग या सोहळ्याची वाट पहात असतो.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होतात. विठू-रखुमाईच्या नामाचा गजरात तल्लीन होतात.
त्यामुळे आषाढी वारीची ओढ संपूर्ण वारकरी सांप्रदयाला लागली आहे.
