👁 11 Views

लाभार्थींचे समाधान हीच योजनेची फलश्रुती… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 सोलापूर दि. 24 :-   राज्य व केंद्र शासनामार्फत शेतकरी, सामान्यांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीला मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान ही त्या योजनेची फलश्रुती व शासनाच्या कामाची पावती असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मंद्रुप येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरु असलेल्या घरकुलाच्या कामाची पहाणी करतांना व्यक्त केले.
            दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुंद्रुप येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत  विठ्ठल लक्ष्मण ऐवळे यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरु असून या कामाची पाहणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली.  यावेळी त्यांनी  ऐवळे कुटुंबाची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन घरकुल बांधकामाची माहिती घेतली व ऐवळे कुटुंबियांना  शुभेच्छा दिल्या.

 यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, जिल्हयाचे पालकमंत्री विजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी  डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. राजेंद्र भरुड  यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *