दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे.
जून : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे.यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. 91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे.
दहावी परीक्षेतही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातील 96.18 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
कसा लागलाय निकाल?
कोकण -96.18 टक्के
कोल्हापूर – 93.59 टक्के
पुणे – 91.95 टक्के
मुंबई – 90.09 टक्के
औरंगाबाद – 88.15 टक्के
नाशिक – 87.76 टक्के
लातूर – 85.22 टक्के
अमरावती – 84.35 टक्के
नागपूर – 83.67 टक्के
दहावीची परीक्षा 7 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली. राज्यातून यंदा 17 लाख 66 हजार 198 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिलीये. त्यामध्ये 9 लाख 89 हजार 908 विद्यार्थी, तर 7 लाख 76 हजार 190 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
राज्यातील एकूण 4 हजार 728 परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना हा निकाल मंडळाच्या वेबसाइटसोबतच इतर वेबसाइटवरही पाहता येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै 2018 मध्ये फेरपरीक्षा होणार आहे.
दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल वेबसाईटवर पाहता येईल.
या वेबसाईटवर पाहा दहावीचा निकाल :
http://www.mahresult.nic.in/
http://result.mkcl.org/
http://mh-ssc.ac.in/Home.aspx
http://m.rediff.com/exam_results
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



