👁 8 Views

पाकविरुद्धचं महायुद्ध इतर सामन्यांप्रमाणेच: कोहली

बर्मिंगहॅम

बांगलादेशवर ९ विकेटने मात करून टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. कोहली ब्रिगेड आता फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी आता सज्ज आहे. दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्याने क्रिकेट रसिकांसाठी फायनलची लढत एक पर्वणीच ठरणार आहे. सामन्याची उत्सुकता क्रिकेट विश्वात असली तरी टीम इंडियावर याचा कोणताही दबाव नाहीय. कर्णधार विराट कोहलीने याची कबुली दिलीय.

‘पाकिस्तानविरुद्धचा सामना आम्हाला इतर सामन्यांप्रमाणेच आहे. माझ्या वक्तव्यात अजिबात वाढीवपणा नाहीय. इतर सामन्यांप्रमाणेच आम्ही पाकविरुद्धच्या सामन्याला सामोरे जाणार आहोत आणि हीच आमची रणनिती आहे ‘, असं कोहली म्हणाला.

मधल्या फळीतील फलंदाजांवर फलंदाजीची वेळच आली नसल्याने त्यांच्या कामगिरीबाबत साशंक नसल्याचंही कोहलीने यावेळी स्पष्ट केलं. ‘स्पर्धेत मधल्या फळीतील फलंदाजांना मैदानात उतरण्याची संधी मिळाली नसली तरी सरावादरम्यान सर्व खूप घाम गाळत आहेत. नेटमध्ये ते चांगली फलंदाजी करत आहेत’, असं कोहली म्हणाला.


केदार जाधवचं कौतुक-

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी दोन विकेट घेऊन संघाला सामन्यात पुनरागमन करून देणाऱ्या केदार जाधवचा कोहलीने आवर्जून उल्लेख केला. ‘केदार जाधव हा आमच्यासाठी सरप्राईज पॅकेज नाही, तर तो एक चलाख खेळाडू आहे. कोणत्या परिस्थितीत कशी गोलंदाजी करायची हे त्याला चांगलं माहित आहे. बांगलादेशने ३०० चा आकडा गाठला असता पण केदारने घेतलेल्या दोन महत्त्वपूर्ण विकेट्समुळे आम्ही त्यांना रोखू शकलो’, असं कोहलीने सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *