१. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने माता-बाल संगोपनाविषयी एक पुस्तिका प्रकाशित केली असून, त्यात गरोदर असलेल्या स्त्रियांना काही सल्ले देण्यात आले आहेत. त्यात गरोदर मातांना अनेक सल्ले देण्यात आले आहेत.
२. तामिळनाडू सरकार येत्या जुलैपासून त्यांच्या राज्यात एक पायलट प्रोजेक्ट सुरू करत आहे. राज्यात गरोदर असलेल्या प्रत्येक स्त्रीने आपल्या गरोदरपणाची नोंद तत्काळ सरकारी आरोग्य विभागाकडे करण्याची ‘सक्ती’ या प्रकल्पात करण्यात येणार आहे.
गर्भावस्थेत स्त्रीचं आरोग्य चांगलं राहावं, तिच्या गर्भाची नीट वाढ व्हावी म्हणून हे ‘प्रेग्नन्सी ट्रॅकिंग’ असेल आणि जी कुणी स्त्री अशी ‘नोंद’ करणार नाही तिच्या बाळाला जन्मदाखला मिळ्णार नाही, अशी ही व्यवस्था असेल.
३. महाराष्ट्रात घरोघरी जाणाऱ्या ‘आशा’ कार्यकर्त्या महिलांच्या मासिक पाळीच्या तारखा हल्ली आग्रहाने टिपून घेऊ लागल्या आहेत.
– या तीन गोष्टींंमध्ये एक साम्य आहे..
आणि त्याविषयी विचारी वर्तुळांमध्ये असंतोष व्यक्त होतो आहे
प्रगती जाधव-पाटील
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!




