सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 7 August 2017
वंचित शेतक-यांच्या पीकनुकसान भरपाईची जबाबदारी सरकारने घ्यावी, अन्यथा कर्जमुक्तीच्या मागणी बरोबरच १४ ऑगस्टच्या चक्का जाम मध्ये पीक विम्याचा मुद्दा घेणार
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – पीक विमा नोंदणीसाठी ऑन लाईनचा अनावश्यक आग्रह धरल्याने राज्यातील ४० टक्के शेतकरी पीक विमा संरक्षणांपासून वंचित राहिले आहेत. आसमानी संकट समोर दिसत असताना शेतक-यांना जाणीव पूर्वक वा-यावर सोडण्यात आले आहे. पीकनुकसान भरपाई देण्याची जबाबदारी टाळण्यासाठी सरकार व विमा कंपन्यांनी मिळून संगनमताने हा गोंधळ घातला आहे. शेतक-यांवर झालेल्या या अन्यायाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी व वंचित राहिलेल्या सर्व शेतक-यांना पीक नुकसानीस भरपाई देण्याची हमी दयावी अशी मागणी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती करत आहे. सरकारने अशी जबाबदारी न घेतल्यास १४ ऑगस्टच्या चक्का जाम आंदोलनात कर्जमाफी व शेतीमालाच्या रास्त भावाच्या मागणीबरोबर पीक विम्याबाबतची मागणीही घेण्यात येईल व राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा सुकाणू समिती देत आहे.
पीक विमा नोंदणीसाठी पुरेशी तयारी न करता मुद्दामहून सरकार व विमा कंपन्यांनी मिळून ऑन लाईनचा फॉर्म भरण्याची अट टाकली. विमा स्वीकारण्याची मुदत १ जुलै ते ३१ जुलै असताना २५ जुलै पर्यंत बँकांना विमा हप्ते स्वीकारण्याबाबत गोंधळात ठेवण्यात आले. या काळात आपला विमा हप्ता जमा करण्यासाठी आलेल्या शेतक-यांना हप्ते न स्वीकारता बँकांमधून वारंवार परत पाठविण्यात आले. वरून स्पष्ट सूचना आलेल्या नसल्याचे कारण सांगून २६ जुलै पर्यंत विमा स्वीकारणे टाळण्यात आले. २६ जुलै नंतर केवळ सहा दिवस उरले असताना विमा हप्ते स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यातही अर्ज ऑन लाईन भरणे सक्तीचे केले गेले. पुरेशी कनेक्टीव्हिटी नसल्याने व सर्वर सातत्याने डाऊन असल्याने ऑन लाईन प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला. थोडेच दिवस हातात शिल्लक असल्याने शेतक-यांना बँकां बाहेर दिवस रात्र रांगा लावून उभे राहावे लागले. हजारोंच्या संख्येने लागलेल्या रांगेत शेतकरी उभे असताना प्रक्रिया ऑफ लाईन पद्धतीने राबविणे आवश्यक होते. शेतकरी संघटनांनी तशी वारंवार मागणी केली होती. सरकारने मात्र तरीही आपला हेका सोडला नाही. परिणामी रांगांमध्ये उभे असलेल्या शेतक-यांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले. बीड येथे शेतक-यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात रामा पोतरे नावाच्या तीस वर्ष वयाच्या शेतक-याला या रांगेमुळे आपला जीव गमवावा लागला. यंत्रणा नसल्याने व केवळ सहाच दिवस मिळाल्याने ३१ जुलै रोजी पिक विम्याची मुदत संपली असता लाखों शेतकरी विमा संरक्षणांपासून वंचित राहिले. शेतक-यांच्या दबावामुळे सरकारने विमा भरण्याची मुदत पाच दिवसांनी वाढविली मात्र यातही ऑन लाईन सक्तीचे केले. या वाढीव दिवसातही हजारो शेतकरी रांगेत उभे असताना पोर्टल डाऊन असल्याने केवळ बोटावर मोजण्या इतक्याच शेतक-यांना विमा भरता आला. सरकारच्या या गोंधळामुळे राज्यभरातील ४० टक्के विमा इच्छुक शेतकरी पीक विमा संरक्षणापासून वंचित राहिले आहेत. पीक विमा योजनेत संरक्षित रकमेच्या केवळ ३५ टक्के पर्यंतचे नुकसानीचे भरपाई दायित्व विमा कंपनीवर आहे. त्यापेक्षा अधिकची भरपाई द्यावी लागल्यास या जादाच्या भरपाईचे दायित्व केंद्र व राज्य सरकारांवर आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


