कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी‘ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सर्व पथकांना साहित्याचे वाटप केल्याची माहितीही श्री.शंभरकर यांनी दिली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. प्रत्येक गावात लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य पथकांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. आरोग्य पथकाला सर्व साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे एक पथक घरोघरी जाऊन आरोग्यविषयक चौकशी करणार आहे. या पथकाला माहिती देऊन सहकार्य करावे. हे पथक प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मोहिमेंतर्गत वैयक्तिक आणि संस्थांसाठी बक्षीस योजना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनो कोणताही आजार लपवू नका. वेळेत उपचार घेतले तर कोरोना बरा होतो, आरोग्य पथकाला संपूर्ण माहिती देण्याचे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले आहे.
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी

