निलेश चाळक बीड : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिक्षात बसवले जात होते,याबाबत पंढरपुर लाईव्ह ने दि,२६ रोजी बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत शहर वाहतूक शाखेने सोमवारी २७ रिक्षांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाया करण्यात आल्या. या कारवाईने सर्वसामान्यांत समाधान व्यक्त होत असले तरी रिक्षाचालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रूपाली साळवे (१३) या विद्यार्थिनीचा रिक्षातून पडून मृत्यू झाल्यानंतर ‘पंढरपुर लाईव्ह’ने २६ नोव्हेंबर रोजी ‘बीड जिल्ह्यात विद्यार्थ्याचा जीवघेणा प्रवास’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून विद्यार्थ्यांची ने-आण करणाºया रिक्षांचा आढावा घेतला होता. यामध्ये बहुतांश रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून बसविल्याचे उघड झाले होते.
त्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी सोमवारी सकाळपासूनच कारवाईची मोहीम हाती घेतली. यावर काही रिक्षाचालकांनी जिल्हाधिका-यांकडे धाव घेतली; परंतु नियमबाह्यपणे रिक्षा चालवीत विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू पाहणा-या रिक्षाचालकांचा हा संताप सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त करणारा आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





