पंढरपूर LIVE 18 Jun 2018
अवघ्या २० रुपयांच्या वादातून पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाचा जीव घेतल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. भाड्याचे पूर्ण पैसे का नाहीत? यावरून प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात वाद सुरु झाला. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. शनिवारी गणेशपेठेत झालेली ही घटना उघडकीस आली आहे. तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अतुल इश्वर हराळे आणि रोहन गोडसे अशी या दोघांची नावे आहेत. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
तानाजी कोरके यांनी शनिवारी पुणे स्टेशनपासून रविवार पेठेकडे जाण्यासाठी अतुल उर्फ इश्वर हराळेची रिक्षा ठरवली. गणेश पेठच्या दरम्यान ते रिक्षातून उतरले. रिक्षाचे भाडे ४० रुपये झाले मात्र तानाजी यांच्याकडे २० रुपयेच होते. उरलेले २० रुपये का नाहीत यावरून रिक्षावाला आणि प्रवासी या दोघांमध्ये वाद सुरु झाला.
अतुल हराळेने त्याचा साथीदार रोहनच्या मदतीने कोरकेंना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तानाजी कोरके यांची शुद्ध हरपली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोरके यांना अतुल हराळेच्याच रिक्षातून ससून रूग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तानाजी कोरके मुळचे लातूरचे रहिवासी होते गेल्या ८ वर्षांपासून ते पुण्यात राहात होते अशीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांना अतुल आणि रोहन या दोघांचा संशय आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ज्यांनी कोरकेंना मारहाण केली ते अतुल आणि रोहन असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या.
अवघ्या २० रुपयांच्या वादातून पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाचा जीव घेतल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. भाड्याचे पूर्ण पैसे का नाहीत? यावरून प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात वाद सुरु झाला. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. शनिवारी गणेशपेठेत झालेली ही घटना उघडकीस आली आहे. तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अतुल इश्वर हराळे आणि रोहन गोडसे अशी या दोघांची नावे आहेत. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
तानाजी कोरके यांनी शनिवारी पुणे स्टेशनपासून रविवार पेठेकडे जाण्यासाठी अतुल उर्फ इश्वर हराळेची रिक्षा ठरवली. गणेश पेठच्या दरम्यान ते रिक्षातून उतरले. रिक्षाचे भाडे ४० रुपये झाले मात्र तानाजी यांच्याकडे २० रुपयेच होते. उरलेले २० रुपये का नाहीत यावरून रिक्षावाला आणि प्रवासी या दोघांमध्ये वाद सुरु झाला.
अतुल हराळेने त्याचा साथीदार रोहनच्या मदतीने कोरकेंना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तानाजी कोरके यांची शुद्ध हरपली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोरके यांना अतुल हराळेच्याच रिक्षातून ससून रूग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तानाजी कोरके मुळचे लातूरचे रहिवासी होते गेल्या ८ वर्षांपासून ते पुण्यात राहात होते अशीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांना अतुल आणि रोहन या दोघांचा संशय आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ज्यांनी कोरकेंना मारहाण केली ते अतुल आणि रोहन असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com




