👁 12 Views

देशात जातीयवाद फोफावलाय!: शरद पवार

नवी दिल्ली


‘अलीकडच्या काळात देशात जातीयवादी शक्ती फोफावल्या आहेत. गुंड लोक स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेऊ लागलेत. त्यांच्यामुळं देशातलं वातावरण कलुषित झालं आहे. असुरक्षितता वाढली आहे,’ अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचं विश्लेषण केलं आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९व्या वर्धापनदिनाचा सोहळा आज दिल्लीत पार पडला. गर्दीच न जमनल्यानं राष्ट्रवादीचा हा कार्यक्रम अर्धा तास उशिरा सुरू झाला. मात्र, शरद पवार यांनी त्याकडं दुर्लक्ष करून आपल्या भाषणात मोदी सरकारच्या कारभारावरच आसूड ओढले. मोदी सरकार तीन वर्षांत पूर्ण अपयशी ठरलं असून देशात बळजबरीनं धर्मांतरं केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. ‘मोदी एकामागोमाग एक विदेश दौरे करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं झाल्याचा दावा केला जातोय. अशावेळी ‘युनो’चा अहवाल वाचायला हवा. त्यात अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यात भारत सरकार अपयशी झाल्याचं नमूद केलंय, याकडंही पवारांनी लक्ष वेधलं.


काय म्हणाले शरद पवार…


>> दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. ते फोल ठरलंय. काळा पैसा १०० दिवसात आणण्याचं वचन सरकारला पाळता आलेलं नाही.

>> मोदी सरकारला ३ वर्षे झाली परंतु, रुपयाचं अवमूल्यन रोखता आलेलं नाही. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत

>> कृषी विकासात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय. कृषी क्षेत्रात रोजगार निर्माण करता आला नाही. किमान आधारभूत किंमतींबद्दल सरकारला निर्णय घेता आलेला नाही. पीक विमा योजनाचे १६ हजार कोटी रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात फक्त ७ हजार कोटी
मिळाले.

>> मंदसौर मध्ये ५ लोकांना गोळ्या घालून मारले. सरकारमुळे हिंसा पसरली आहे. शेतकऱ्यांची सहनशीलता का कमी होतेय, हे सरकारनं पाहायला हवं.



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *