👁 11 Views

उद्धव ठाकरेंमुळं शेतकऱ्यांचा विजय: शिवसेना

 मुंबई


राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा फडणवीस सरकारनं केल्यानंतर आता या निर्णयावरून श्रेयाची लढाई सुरू होण्याची चिन्हं आहेत. शेतकऱ्यांच्या या विजयाचा मुकुट स्वत:च्या शिरावर चढवून घेण्याचे प्रयत्न शिवसेनेनं सुरू केले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश मिळाल्याचा दावा करणारी पोस्टर सेनेनं मुंबईत झळकवली आहेत.


संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. सत्ताधारी पक्षच आंदोलनाच्या बाजूनं असल्यानं भाजपची कोंडी झाली होती. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगीही पडली होती. आंदोलन सुरू असताना भाजपनं शिवसेनेला फारसे विश्वासात घेतले नव्हते. त्यावरून शिवसेनेनं मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. मात्र, भाजपनं त्याला फारसे महत्त्व न दिल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थापलेल्या उच्चाधिकार मंत्रिगटात सहभागी व्हावे लागले.


आता कर्जमाफीच्या निर्णयानंतर सेनेनं पुन्हा एकदा भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून कर्जमाफीचं श्रेय घेणारी पोस्टर मुंबईत झळकवण्यात आली आहेत. अखेर सातबारा कोरा झाला. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ… अल्पभूधारकांना नवीन कर्जवाटप… उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश… असं शिवसेनेनं पोस्टरमध्ये नमूद केलं आहे

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *