👁 13 Views

आहार हा तिच्या वैयक्तिक निवडीचा प्रश्न

मुंबई


गर्भवती महिलेने काय खावे व काय खाऊ नये हा तिच्या वैयक्तिक आहारस्वातंत्र्याचा मुद्दा आहे. त्याला रोख लावणारे आयुष मंत्रालय कोण, असा थेट सवाल स्त्रीप्रसूतीतज्ज्ञांसह वैद्यकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित केला आहे. गर्भारपणाच्या काळात आहारातील विविध पदार्थ खावेसे वाटतात. मासांहार न करणा-या महिलांना मासाही खावासा वाटतो, तर शाकाहार विशेष आवडीचा नसलेल्या एखादीला विशिष्ट भाजी खाण्याचेही डोहाळे लागतात. अशावेळी गर्भवती महिलांनी शाकाहार करावा, मासांहार करू नये, असा सल्ला डॉक्टर कसा देणार, असा प्रश्नही डॉक्टरांनी विचारला आहे.


निरोगी बाळ हवे असल्यास गर्भवती महिलांनी मांसाहार टाळावा तसेच जोडीदाराशी शरीरसंबंध ठेवू नयेत, असा अजब सल्ला केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिला आहे. आयुषतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मदर अँड चाइल्ड केअर’ या पुस्तिकेत हा सल्ला देण्यात आला आहे. त्यावर डॉक्टरांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे.


प्रत्येक व्यक्तीच्या आहारनिवडीचे व आवडीचे स्वतंत्र पर्याय असतात. गर्भवती माता जर मासांहारी असेल, तर तिचा ओढा साहजिकच त्या पदार्थांच्या सेवनाकडे अधिक असतो. अचानक तिचा हा आहार बंद करून तिला न रुचणारा शाकाहार सुरू करण्यास सांगितले, तर ते बाळाच्या वाढीसाठी पोषक कसे ठरेल, त्याऐवजी जे मातेसाठी योग्य व बाळाच्या वाढीसाठी योग्य आहे, तोच आहार गर्भवती महिलांना घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्वीनी भालेराव- गांधी यांनी ‘मटा’ला सांगितले.


गरोदर महिलांचा आहार संतुलित असणे गरजेचे असते. मात्र अमुक एखाद्या आहाराचा गर्भावर विशिष्ट परिणाम होतो, त्यामुळे मासांहार गरोदरपणात बंद करावा, असे कुठेही सांगितले नाही, असे स्पष्ट मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बंदिता स्निहा यांनी व्यक्त केले आहे.


जोडीदाराच्या शारीरिक गरजांचाही विचार


शरीरसंबंध ठेवावेत की नाही, ही गरोदरपणातील मातेच्या अवस्थेवर अवंलबून असलेली बाब आहे. या काळात तिची वार अधिक खाली आली असेल, कोणत्याही कारणास्तव रक्तस्त्राव होत असेल, वा या बाळंतपणापूर्वी गर्भपात झाले असतील, तर जोडप्याला प्रसूती होईपर्यंत शरीरसंबध न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र जर या प्रकारचे कोणतेही गुंतागुंत नसेल, तर असा कोणताही अटकाव डॉक्टर करत नाही. प्रसूती ते बाळंतपण त्यानंतर स्तनपान हा संपूर्ण काळ किमान दीड वर्षाचा धरला, तर त्यात तिच्या जोडीदाराच्या शारीरिक गरजांचाही
वैद्यकीयदृष्ट्या विचार केला जातो, असेही डॉ. अश्वीनी भालेराव- गांधी यांनी स्पष्ट केले आहे.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *