👁 11 Views

सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘बीच सॅक धोरण’ राबविणार – राज्यमंत्री मदन येरावार  

            मुंबईदि. 19 : गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच सॅक धोरण राबविणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज येथे सांगितले.
            राज्यात बीच सॅक धोरण तयार करण्याबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
            यावेळी श्री. येरावार म्हणाले कीपर्यटकांना सागरी किनाऱ्यावर राहण्याचा आनंद घेण्याची मनस्वी इच्छा असते. बीच सॅकहट्सअंब्रेला इत्यादी सुविधा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अशा सुविधेला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत असून त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. तारकर्लीशिरोडा-वेळागरमुरुड-दापोलीगणपतीपुळेअलिबागदिवे-आगारआक्षी-नागांवकेळवाबोर्डी इ. ठिकाणी विस्तीर्ण समुद्र किनारे आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बीच सॅकहट्सअंब्रेला अशा सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता धोरण ठरविण्यासाठी नगरविकास विभागग्रामविकास विभागमहाराष्ट्र सागरी किनारा नियंत्रण (MCZMA), महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डआरोग्य विभागमहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळअन्न व औषधी विभाग या विभागांची समिती स्थापन करुन धोरण ठरविले जाईलअसे श्री. येरावार यांनी यावेळी सांगितले.
            बीच सॅक-बीच सॅक म्हणजे समुद्र किनारी तात्पुरत्या स्वरुपात बांबूच्या सहाय्याने तयार केलेली झोपडी होय. यामध्ये किचनफर्निचरटॉयलेटफायर कव्हर, फर्स्ट एड (Fire cover/First Aid) इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. बीच सॅक सुविधा ही 1 सप्टेंबर ते 31 मे या कालावधीत पर्यटकांकरीता उपलब्ध करुन देण्यात येते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *