ऑनलाइन वृत्त । आग्रा‘भारतीय नागरिकांनी आपला प्रत्येक सण पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून साजरा करावा. ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे,’ असं आवाहन भाजपचे आग्रा शहराचे महापौर इंद्रजीत आर्य यांनी केलं आहे.
वाराणसीतील हिंद-बलोच फोरमनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना आर्य यांनी हे आवाहन केलं. ‘बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताची भूमिका’ या विषयावर २० जून रोजी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी आर्या यांनी पाकिस्तानवर तोफ डागली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरला झाला आहे. ‘आमचे जवान शेजारी देशाला सीमेवर सडेतोड प्रत्युत्तर देताहेत. अशा वेळी आपणही काहीतरी कृती करून पाकला योग्य संदेश द्यायला हवा. केवळ सणासुदीलाच नव्हे तर, प्रत्येक कार्यक्रमाआधी पाकचा झेंडा जाळला गेला पाहिजे. तसं झालं तर पाकिस्तानचा पुळका असलेले लोक आपोआप वेगळे पडतील आणि पाकलाही चपराक मिळेल,’ असं आर्य म्हणाले.
‘काश्मीरच्या नावावर पाकिस्तान दहशतवादी कारवाया करतोय. भारत-चीनमध्ये भांडणं लावण्याची कामं करतोय. आपणही त्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आलीय. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून हे करायला हवं. त्यासाठी आम्ही देशभरात मोहीम राबवणार आहोत. जोपर्यंत आपण एकजूट होत नाही. आपला राग व्यक्त करत नाही, तोपर्यंत त्यांना धडा मिळणार नाही,’ असंही ते म्हणाले.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
Web Title: burn pakistani flag before every festival says agra mayor
(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



