👁 9 Views

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड रोखली

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – या वर्षीच्या हंगामात उसाला पहिली उचल अडीच सहस्र रुपये घोषित करावी 


आणि अंतिम भाव ३ सहस्र १०० रुपये द्यावा, अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीने केली आहे.


मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत परिसरात चालू असलेली ऊसतोड रोखली,


 तसेच ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकांनाही ऊस वाहतूक न करण्याविषयी आवाहन केले.


 सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम चालू झाला आहे; 

मात्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप उसाची पहिली उचल घोषित केलेली नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *