पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – या वर्षीच्या हंगामात उसाला पहिली उचल अडीच सहस्र रुपये घोषित करावी
आणि अंतिम भाव ३ सहस्र १०० रुपये द्यावा, अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीने केली आहे.
मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत परिसरात चालू असलेली ऊसतोड रोखली,
तसेच ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर मालकांनाही ऊस वाहतूक न करण्याविषयी आवाहन केले.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम चालू झाला आहे;
मात्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप उसाची पहिली उचल घोषित केलेली नाही.




