
राज्यात सध्या नगरसह अनेक येथील पोलीस ठाणे प्रलंबित आहेत. मात्र नवीन पोलीस ठाणे मंजूर करायचं असेल तर क्राइम रेट वाढवावा लागतो. त्यामुळं तुम्हाला काही कमी पडलं तर क्राइम रेट वाढवणे हाती घ्यावं लागेल, हे मला गृहराज्यमंत्री झाल्यानंतर समजल्याची मुक्ताफळं राम शिंदेंनी उधळली आहेत. अहमदनगरला पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर यावेळी गृह विभागचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राम शिंदे यांच्या विधानानंतर, प्रत्यक्षात काही भागात पोलीस स्टेशन मंजूर करायंच असेल तर त्यासाठी कुठल्या बाबींची आवश्यकता असते हे ते पाहुया…