सोलापूर जिल्ह्यासाठी उजनीचे पाणी महत्वाचे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे आवश्यक- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पंढरपूर लाईव्ह वृत्त दि. 22-1-2016
पुणे व सोलापूर जिल्ह्यासाठी उजणी धरण हे वरदायिनी असुन त्याचे पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वाचे आहे. दरम्यान  सरकार या  प्रकरणी राजकारण करीत असल्याने शेतकरी व नागरीक यांना हे पाणी मिळनासे झाले आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाण्याचा प्रश्न चिघळून जाणेच्या अगोदरच स्वतः मुख्यमंत्री यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे. व यासाठी त्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आले असताना व्यक्त केले.

यावेळी येथील विश्राम गृहावर पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप करताना विविध मुद्द्यांवर आपले विचार स्पष्ट केले

यावेळी त्यांचे समवेत आमदार भारत भालके व काॅग्रेसचे प्रकाश पाटील उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *