👁 5 Views

मुलाच्या हव्यासापोटी पत्नीला संपवलं, 2 मुली झाल्याने सुरू होता छळ

 

करवीर  तालुक्यातील दाेनवडे या गावात मुलाच्या हव्यासापोटी पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे.


घटनेने संपुर्ण कोल्हापुर  जिल्हा हादरुन गेला आहे. अश्विनी एकनाथ पाटील असे मृत विवाहित महिलेचे  नाव आहे. 


आश्विनी यांचा एकनाथ पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यांना दाेन अपत्य आहेत. दाेन्ही अपत्य या मुली आहेत. त्यामुळे त्यांचा छळ केला जात असे. त्यांचे पती एकनाथ यांना मुलगा हवा हाेता. त्यासाठी ते सतत पत्नीला त्रास देत असतं. 


मुलाच्या हव्यासापोटी एकनाथ पाटील यांनी पत्नी आश्विनीचा खून केला. या गुन्हा लपविण्यासाठी एकनाथ यांनी त्या विजेचा शाॅक लागल्याने मृत्यूमुखी पडल्या असा बनाव केला. दरम्यान या घटनेला एकनाथ पाटील याला जबाबदार धरत पोलिसांनी त्याला अटक  केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *