राज्यात 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक

मुंबई – 05 फेब्रुवारी न्हाळ्याची चाहूल लागत असतानाच राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात प्रमुख शहरांमध्ये सध्याच्या स्थितीत फक्त 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्हे पाणीटंचाईने होरपळून निघाले आहेत. पुणे, नाशिक अमरावती जिल्हात मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठे खालानले आहेत.
अपुर्‍या पावसामुळे राज्यात सर्वत्र टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणं शंभर टक्के भरलेली नाहीत. सर्वात कमी पाणीसाठा हा मराठवाड्यांमधल्या धरणांमध्ये आहे. यावर्षी फक्त आठ टक्केच हा साठा आहे.
राज्यातलं एक मोठं धरण असलेल्या जायकवाडीमध्ये फक्त सहा टक्के पाणीसाठा आहे. तर मराठवाड्यातली अनेक धरणं कोरडी ठाक आहेत. उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी आहेत. अशा स्थितीत पिण्याचे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न जिल्हा प्रशासना समोर निर्माण झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *