15 मे :
मान्सूनचं केरळमधलं आगमन काहीसं लांबण्याचा
अंदाज आता भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये
दाखल होणारा वरूणराजा यंदा 7 जूनपर्यंत केरळमध्ये येईल असा अंदाज हवामान
विभागानं मांडलाय.
या अंदाजात 4 दिवस पुढे आणि 4 दिवस
मागे जाण्याची शक्यता आहे. 2005 ते 2015 या 11 वर्षापैकी दहा वेळा
मान्सूच्या आगमनाचे भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेले अंदाज अचूक ठरले
आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2015मध्ये मात्र हा अंदाज चुकला होता.
यंदा केरळच्या किनार्यावर मॉन्सूनचे आगमन 7 जूनला होण्याची शक्यता
वर्तवली आहे. मात्र, अंदमान आणि निकोबारमध्ये मंगळवारपर्यंत मॉन्सूनचं आगमन
होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा त्यापुढील प्रवास संथ गतीने होण्याची
शक्यता आहे.
आहे. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये जोरदार पावसाचा अंदाज
व्यक्त केला आहे. सध्या देशातील काही भागांत पूर्वमोसमी पाऊस पडत आहे.
मॉन्सून सर्वसाधारणपणे 20 मे रोजी अंदमानात दाखल होतो. यंदा तो
नेहमीच्या वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच दाखल होण्याची चिन्हे आहेत.
अंदमानपाठोपाठ 25 मे रोजी श्रीलंकेत आणि एक जूनला केरळात मॉन्सून दाखल
होतो. पण, यंदा त्याला उशीर होण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनच्या आगमनाच्या
सर्वसाधारण तारखा आणि त्याची यंदाच्या वाटचालीचा विचार करता मॉन्सूनचे
महाराष्ट्रातील आगमनही लांबणार असल्याचे चित्र आहे.

