👁 10 Views

नवरदेव बोहल्यावर चढण्यासाठी 10 मिनिटे असतांना पोलिसांनी रोखला बालविवाह

औरंगाबाद- पुंडलिकनगर येथील चैतन्य मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह सोमवारी दुपारी वाजेच्या सुमारास पोलिसांनी रोखला. नवरदेव बोहल्यावर चढण्यासाठी केवळ दहा मिनिटांचा अवधी असतानाच पुंडलिकनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. कागदपत्रे तपासल्यानंतर १७ वर्षांच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा दहा वर्षे मोठ्या असणाऱ्या मुलासोबत लावून देण्यात येत असल्याचे आढळून आले.
पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी या मुलीची चौकशी केली असता मला अधिकारी व्हायचे आहे, मात्र घरचे माझे लग्न लावून देत आहेत, असा जबाब तिने पोलिसांना दिला. तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. वडील एका खासगी कंपनीत कामगार आहेत. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले. त्यानंतर लग्नासाठी आलेले २०० पाहुणे जेवण करून परतले. भावी नवरदेव महावितरणमध्ये वायरमन म्हणून काम करत असल्याचे कळते. पोलिस उपनिरीक्षक आर. एस. पवार, शेख सलीम, सुनील राऊत, बन, गायकवाड, मीनाक्षी जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी या पथकाला मार्गदर्शन केले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *