बालमृत्यूसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप
वस्तू आणि सेवाकर विधेयक (जीएसटी) ही भाजपची नव्हे तर काँग्रेसची देणगी असल्याचे काँग्रेस नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. काँग्रेसने जेव्हा जीएसटी विधेयक मांडले त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या नरेंद्र मोदींनी विधेयकाला विरोध केला होता अशी आठवणही त्यांनी करुन दिली. राज्यातील बालमृत्यूसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सोमवारी राज्यातील विधानसभा आणि विधानसभेत जीएसटी विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने जीएसटी विधेयक मांडले तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला होता. कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. पण आता त्यांच्याच सरकारने हे विधेयक मंजूर करून घेतले याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले. विधीमंडळात जीएसटी विधेयक मंजूर झाले, पण शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली नाही हे दुर्दैवी असल्याचे विखे पाटील म्हणालेत. कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांचा लढा सुरुच राहणार असून विरोधकांच्या संघर्ष यात्रेमुळे सरकारवर दबाव निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





