👁 11 Views

शेतकऱ्यांचा विजय, तत्त्वत: सरसकट कर्जमाफी द्यायला राज्यसरकार तयार

राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी देण्याचं जाहीर करण्यात आलंय.


11 जून : राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय झालाय. राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी देण्याचं जाहीर करण्यात आलंय. राज्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं तत्त्वतः मान्य करण्यात आलंय. शेतकऱ्यांची सुकाणू समिती आणि सरकारच्या मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
ज्या आंदोलकांकडे लुटीचा माल सापडलाय ते आंदोलक वगळून सर्वच आंदोलकांवरील गुन्हे मागं घेण्यात येणार आहेत. शिवाय 20 जूनला दुधाचे दर ठरवण्यात येणार आहेत.
शिवसेना या आंदोलनात शेतकाऱ्यांबरोबर होती, आम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडली, असं दिवाकर रावते म्हणाले.
सुकाणू समितीचे बच्चू कडू, खासदार राजू शेट्टी , रघुनाथदादा पाटील, आमदार जयंत पाटील, ज्योत्स्ना पाटील, प्रतिभा शिंदे यांची मंत्रीगटाबरोबर बैठक सुरू होती.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *