👁 13 Views

मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी!

राज्याचे मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे दोनच व्यक्ती सर्वात सुखी आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी वाशीम येथे केली. स्‍थानिक जैन भवनमध्‍ये आयोजित संवाद दौरा कार्यक्रमानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ‌केंद्र आणि राज्य शासनासह शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर ‌टीका केली.


शिवसेनेबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पूर्वी शिवसेनेचा धाक वाटायचा. बोललेले कृतीतून दाखवण्याची शिवसेनाप्रमुखांची पद्धत असायची. दुर्दैवाने आजघडीला सेनेचा वाघ आता शेळी झाला आहे. कधीकाळी शिव छत्रपतींच्या नावाने तळपणारी तलवार आता म्यान झाली आहे. ‘सरकारमधून बाहेर पडतो’ हे एवढ्या वेळ म्हटल्या गेले की आता त्यावर सर्वसामान्याचाही विश्वास बसत नाही. खिशात असणाऱ्या राजीनाम्यांचे काय झाले, हेही आता कोणी विचार नाही. भाजपा ‘चालते व्हा’ म्हणत असले तरी, तरी ‘तुझे माझे जमेना-तुझ्यावाचून करमेना’ अशी स्थिती सेनेची आहे. तेव्हा सेनेत हिंमत असेन तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे आवाहनही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.


‘या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच व्यक्ती देश चालवत असून तेच खऱ्या अर्थाने सुखी आहेत. त्यांच्याशिवाय कोणीही सुखी नाही. अगदी त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ मंडळीही. एव्हाना मुख्यमंत्री फडणवीस हे, काहीही झाले की अभ्यास सुरू करीत असल्याने मला त्यांची दया येते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. मुख्यमंत्र्यांना आता तीन वर्षे होत आहेत आणि विद्यार्थी एकाच वर्गात तीन वर्ष अभ्यास करीत असेल, तर अशा ‘ढ’ विद्यार्थ्याला कुणाची तरी शिकवणी लावण्याची गरज आहे, असे टीकाही त्यांनी केली.


पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष शुभदा नायक यांची उपस्थिती होती.


उद्धव ठाकरे यांच्या नावातच ‘यू-टर्न’


राष्ट्रपतिपदाची निवडणूक असो की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय; शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भूमिका नेहमीच भाजपच्या विरोधात राहिली आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेबाबत नेहमी ‘यू-टर्न’च दिसत असून त्यांच्या नावातच ‘यू-टर्न’ आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यवतमाळ येथे पत्रपरिषदेत केली. पक्षबांधणीसाठी बुधवारी त्या जिल्ह्यात आल्या होत्या. ‘शिवसेना नेहमी सत्तेतून बाहेर पडणार, आम्हाला सत्तेची हाव नाही’, अशा धमक्या देत होती. मात्र, या धमक्याच ठरल्या, असा‌ चिमटाही त्यांनी यावेळी घेतला. सध्या मध्यवर्ती निवडणुकीची चर्चा सुरू आहे. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. मात्र, निवडणुकीचा बोझा सर्वसामान्यांवर पडू नये, अशी आमची इच्छा आहे. कर्जमाफीबाबत शासनाचा गोंधळ उडालेला असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, असे त्या म्हणाल्या. जीएसटीला आमचे पूर्वीही समर्थन होते आणि आजही राहील, असे त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला माजी मंत्री, आमदार मनोहर नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया यांची उपस्थिती होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *