11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 21 August 2017
औरंगाबाद : मराठवाड्यात कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनामध्ये ९ जणांचा बळी गेला आहे. तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली.
बीड, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. हवामान खात्यानं मराठवाड्यात अतिवृष्टीचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असून 421 पैकी 170 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यंदा चांगला आणि वेळेवर पाऊस पडणार असा हवामान खात्यानं एप्रिल- मे महिन्यातच अंदाज व्यक्त केल्याने बळीराजानं जूनमध्ये पाऊस पडताच पेरण्या केल्या.
मात्र, त्यानंतर अधुन-मधून हजेरी लाऊन पाऊस गायब झाला होता. त्यामुळे मराठवाडयातील पिकं करपून गेली. या पिकामधून यावर्षी उत्पादन मिळणार नसलं तरी येणा-या रबी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणारय. शेतक-यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळाच्या पूर्वसंध्येला पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनामध्ये ९ जणांचा बळी गेला आहे. तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली.
बीड, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. हवामान खात्यानं मराठवाड्यात अतिवृष्टीचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असून 421 पैकी 170 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यंदा चांगला आणि वेळेवर पाऊस पडणार असा हवामान खात्यानं एप्रिल- मे महिन्यातच अंदाज व्यक्त केल्याने बळीराजानं जूनमध्ये पाऊस पडताच पेरण्या केल्या.
मात्र, त्यानंतर अधुन-मधून हजेरी लाऊन पाऊस गायब झाला होता. त्यामुळे मराठवाडयातील पिकं करपून गेली. या पिकामधून यावर्षी उत्पादन मिळणार नसलं तरी येणा-या रबी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणारय. शेतक-यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळाच्या पूर्वसंध्येला पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


