👁 9 Views

विठ्ठल साखर कारखाना सुरु करण्यासाठी नानांच्या पाच मासिकात आलो नाही : भगीरथ भालके



विठ्ठल साखर कारखाना सुरु करण्यासाठी नानांच्या पाच मासिकात आलो नाही : भगीरथ भालके


 विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी कोर्टी तिसंगी सोनके खर्डी होळी आदी भागात प्रचार सभा संपन्न झाली त्यावेळी विठ्ठल चे चेअरमन भगीरथ भालके बोलत होते. यावेळी भगिरथ भालके म्हणाले की भारतनाना भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू राहावा याकरिता नानांच्या पाच मासिकात मला येता आले नाही. 

कुटुंबावर दुःखाचा डोंगर असताना कुटुंबासह नातेवाईकांची भेट घेता आली नाही याचे दुःख मला होत आहे. 

कुटुंबापासून कधी पंधरा दिवस कधी महिना कधी दोन महिने दूर होतो. शेतकऱ्यांचे पैसे मिळवण्यासाठी कृषी माजी कृषीमंत्री शरद पवार उपमुख्य मंत्री अजित पवारजयंत पाटील पाटबंधारेमंत्री जयंत पाटील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कायम पाठपुरावा केला, परंतु सहकारी संचालक युवराज पाटील यांनी साखर आयुक्त वित्तीय बँका साखरव्यापारी खरे दाखल करून कारखाना अडचणीत आणण्याचे काम केले. 




तेच युवराज पाटील विरोध करून आज गावोगावी प्रचार सभेत शेतकऱ्यांचे पैसे कामगारांचे पैसे देण्याचा आरोप करत आहेत असे भगीरथ भालके म्हणाले. 

 यावेळी समाधान काळे दिलीप धोत्रे साळुंखे भालचंद्र मोरे माजी नगरसेवक अमित डोंबेशशिकांतपाटील गोकुळ जाधव दत्तात्रय पाटील द्रोनाचाऱ्या हक्के शशिकांत बागलभारत कोळेकर दत्तात्रय खरात बाबा हाके धोंडीबा वाघमारे बापूसाहेब गायकवाड अनिल वाघमोडे सिद्धेश्वर मोरे मधुकर मोरे सुदाम मोरे महादेव देठेपरमेश्वर देठेधनाजी घाडगे नेताजी सावंत शालिवाहनकोळेकर भास्कर मोरे नारायण शिंदे आधी विठ्ठल परिवारातील कार्यकर्ते विद्यमान संचालक माजी संचालक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *