👁 6 Views

राष्ट्रीय रुरबन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी -ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे



पंढरपूर Live 20 NOVEMBER 2017

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी
मुंबईदि.२० : ग्रामीण भागातील गावांच्या समुहांचा आर्थिकसामाजिक आणि भौतिक विकास करण्यासाठी तसेच शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय रुरबन अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
            मंत्रालयीन दालनात औरंगाबादबीडजालना या ठिकाणच्या शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरआमदार प्रशांत बंबग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यारुरबन अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावसमुहांच्या विकासासाठीचा सर्व निधी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेतून एक केंद्रभिमुखता (Convergence) द्वारे प्राप्त होणार आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांव्यतिरिक्त स्थानिक गरजांच्या आवश्यकतेनुसार गावसमुहांच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासू शकते. उदा. एखाद्या गावसमुहामध्ये मोबाईल हेल्थ युनिट पुरविणेगावातील महिलांसाठी एखाद्या कुटीरोद्योग इ. प्रकारच्या गरजांसाठी योजनेंतर्गत कोणतीही तरतूद उपलब्ध नसते त्यामुळे स्थानिक गरजेनुसार अशी विकास कामे करण्यासाठी त्या संबंधीतला विस्तृत प्रकल्प अहवाल केंद्र शासनास सादर केल्यानंतर केंद्र शासनाच्या उणिवा निवारण निधी (Critical Gap Funding) मधून निधी उपलब्ध करुन दिला जातो.
हा निधी योजनांमधून मिळणाऱ्या निधीशिवाय अतिरिक्त निधी असतो. संपूर्ण उणिवा निवारण निधी हा केंद्र शासनामार्फत अभियानांतर्गत उपलब्ध करुन दिला जातो. निधी बिगर आदिवासी भागात प्रकल्प भांडवली मुल्याच्या ३० टक्के किंवा ३० कोटी रुपये यापैकी जो कमी असेल तो दिला जातो. तसेच आदिवासी भागात प्रकल्प भांडवली मुल्यांच्या ३० टक्के किंवा १५ कोटी रुपये यापैकी जो निधी कमी असेल तो दिला जातो असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. 
केंद्र व राज्य शासनाच्या योजना एक केंद्राभिमुख पध्दतीने राबवाव्यात
-बबनराव लोणीकर
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले कीगावसमुहांचा विकास करतांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना एक केंद्रभिमुख पध्दतीने राबवून कौशल्य विकास प्रशिक्षणकृषी प्रक्रियास्टोरेज आणि गोदाममोबाईल आरोग्य युनिटशाळा सुधारणाउच्च शिक्षण सुविधास्वच्छतानळाद्वारे पाणीपुरवठाघन आणि द्रव कचरा व्यवस्थापनगावांतर्गत गटारेरस्त्यावरील दिवेगाव अंतर्गत रस्ते जोडणीसार्वजनिक वाहतूकएल.पी.जी. गॅस कनेक्शनडीजीटल साक्षरता आणि नागरिक सेवा केंद्र अशा बाबींचा विकास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय रुरबन अभियानाची
बीड जिल्हयात होत आहे प्रभावी अंमलबजावणी
बीड जिल्हयामध्ये दीन दयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात येत आहे. गावांतर्गत रस्त्यांची कामे झालेली आहेत. परळी तालुक्यात १९ गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. ही गावे स्मार्ट ग्रामच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. दीन दयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेंतर्गत शिरसाळा येथे ७२ घरांच्या वसाहतीचे काम प्रगतीपथावर असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. 


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *