👁 1 Views

पंढरीच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी साहित्य संमेलनात केला सारस्वतांचा सत्कार… ‘काव्यकट्टा’ मध्ये सादर केलेल्या ‘देव नाही आमचा विचारच बाटला’ या त्यांच्या कवितेस भरभरुन दाद …

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- (दि.17 जानेवारी 2016)

पुणे येथे चालु असलेल्या 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये पंढरपूरच्या कवयित्री सौ. रत्नप्रभा  पाटील  यांनी ‘काव्यकट्टा’ च्या मंचकावर आपली ‘देव नाही आमचा विचारच बाटला’ही कविता सादर केली. तेंव्हा उपस्थित साहित्य रसिकांसह साहित्यीकांनी टाळ्यावाजवत या कवितेला भरभरुन दाद दिली.  यावेळी सौ. पाटील  यांनी संमेलनाचे अध्यक्ष श्री.सबनिस यांना आपला कविता संग्रह भेट दिला. तसेच कवी फ.मु. शिंदे यांना समस्त पंढरपूरकरांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

साहित्य संमेलनामधील रत्नप्रभा पाटील यांच्यासह साहित्यीक व रसिक प्रेक्षकांची कांही क्षणचित्रे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *