👁 15 Views

तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

कल्याण

जमिनीच्या सात-बारावर आपले नाव टाकण्यासाठी तब्बल २ वर्षापासून वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारूनही आपले काम होत नसल्यामुळे निराश झालेल्या अशोक शंकर देसले (५८) या शेतकऱ्याने बुधवारी तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली.

अशोक देसले यांच्याकडील कागदपत्रे अपुरी असल्याची कारणे देत प्रत्येक वेळी त्यांना परत पाठवले जात होते. देसले यांच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच परिसरातील नागरिकांनी तहसील कार्यालयात धाव घेतली. दरम्यान, सात-बारावर नाव टाकण्यासाठी तहसीलदार म्हस्के पाटील यांनी आपल्या वडिलांकडे २ लाख रुपयाची लाच मागितली होती, असा आरोप देसले यांच्या मुलाने केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने तहसीलदार म्हस्के पाटील यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *