👁 9 Views

२६ मे पासून भाजपचा ‘मोदी फेस्टिव्हल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. भाजपने या यशस्वी वाटचालीचा जल्लोष साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्यानिमित्त देशभरात ‘मोदी फेस्टिव्हल’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २१ दिवस चालणाऱ्या या ‘मोदी फेस्टिव्हल’ निमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सरकारला तीन वर्ष पुर्ण होत असल्याने भाजप ‘मोदी फेस्टिव्हल’ (making of developing india) साजरा करणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला २६ जून रोजी ३ वर्षपूर्ण होत आहे. त्यानिमित्त २६ जून ते १५ मे पर्यंत देशभरात हा फेस्टिव्हल साजरा केला जाणार आहे. केंद्रातील सर्व मंत्री आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच कार्यकर्ते या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.

नवी टॅग लाइन वापरणार

मोदी सरकार आल्यापासून देश बदलत असल्याचं चित्रं भाजपकडून वारंवार रंगवलं जात आहे. देशाच्या विकासाची गती वाढली असल्याचंही भाजपकडून ठासून सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आता नवी टॅग लाइन जारी करणार आहे. आताच्या ‘देश बदल रहा है’ या टॅग लाइनमध्ये ‘भारत उभर रहा है’ अशी जोड देण्यात येणार आहे. त्यामुळे ‘देश बदल रहा है, भारत उभर रहा है,’ अशी नवी टॅग लाइन लवकरच ऐकायला मिळणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

५ शहरांत मोदी
सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मोदी देशातील पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये जाऊन सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहेत. २६ मे रोजी गुवाहाटीवरून या दौऱ्याला सुरूवात होईल. त्यानंतर बंगळुरू, पुणे, दिल्ली, कोलकाता आणि जयपूर किंवा कोटा या शहरात ते जाणार आहेत. यावेळी या शहरांमध्ये होणाऱ्या रॅलींना ते संबोधित करतील. यावेळी ते ‘न्यू इंडिया’ नावाने एक कँम्पेनही सुरू करणार आहेत. ही मोहिम २५ मेपासून सुरू होईल.

२१ दिवस चालणाऱ्या या ‘मोदी फेस्टिव्हल’च्या निमित्ताने सर्व केंद्रीय मंत्री उज्ज्वल योजनेसहित केंद्राच्या सर्व योजनांच्या लाभार्थींबरोबर नाश्ता, दुपार आणि रात्रीचे जेवण घेणार आहेत. त्याशिवाय २७ आणि २८ मे रोजी मोदी सरकारचे कॅबिनेट मंत्री सरकारच्या कामांचा लेखाजोखा प्रसारमाध्यमांसमोर ठेवणार आहेत. तसेच अराजकीय लोकांशीही ते चर्चा करणार आहेत.

२ लाख पत्र लिहिणार

सरकारला तीन वर्षपूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशभरातील २ कोटी सर्वसामान्य लोकांना पत्र पाठवून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे १५ दिवसात १० कोटी लोकांना एसएमएसही पाठविण्यात येणार आहेत. ‘मोदी फेस्टिव्हल’च्या काळात ५०० शहरात ‘सबका साथ सबका विकासा’चे कार्यक्रमही पार पडणार आहेत. २६ मे रोजी देशातील ४०० वर्तमानपत्रांमध्ये सरकारच्या कामाचा आढावा घेणाऱ्या जाहिरातीही छापण्यात येणार आहेत. शिवाय टीव्ही आणि रेडियोवर ३० ते ६० सेकंदाच्या जाहिराती झळकणार आहेत. या काळात प्रत्येक मंत्री ४ शहरात जातील. यावेळी शेतकरी, मजूर, महिला, तरूण, दलित आणि मागासवर्गातील लोकांशी हे मंत्री संवाद साधणार आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *