बुलढाण्यात एक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, निसर्ग साथ देत नाही.
नांदुरा तालुक्यातील बेलूरा येथील 70 वर्षीय वसंत डामरे आणि 65 वर्षीय सौ.सरलाबाई वसंत डामरे हे आपल्या मुलासोबत राहत होते. यांच्याकडे 2 एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. अत्यल्प शेती असल्याने त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता. तसेच सरलाबाई यांची तब्येत कमजोर असल्याने त्या सतत आजारी असायच्या. त्यांच्या ओषधपाण्यासाठी बरेच पैसे खर्च होत होते.
यावेळी शेतीतून पत्नीच्या आजाराला लागलेला खर्च तसेच महाराष्ट्र बँकेचे शेतीसाठी घेतलेले कर्ज, शेतीला लावलेला खर्च निघाला नाही. कुटुंबातील 5 ते 6 जणांचा उदरनिर्वाह कसा करावा, कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच सरलाबाई डामरे आणि वसंत डामरे यांनी विषारी औषध प्राशन केले आणि आपली जीवनयात्रा संपविली. डामरे कुटुंबं उघड्यावर पडले असून बोराखेडी पोलिसांनी शव विच्चेदनासाठी सामान्य रुग्णाल्यात शव पाठविले आहेत.



